गिरीष महाजनांना योग्य रितीने उत्तर मिळेल; हा काळाचा नियम (व्हिडीओ)

रावेर (शालिक महाजन) । बोरखेडा पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज कटप्पा कोण ? या प्रश्नाचे उत्तर थेट देणे टाळले, मात्र गिरीष महाजनांना योग्यरितीने उत्तर मिळेल, कारण काळाचा नियमच असा असतो, सध्या या घडामोडींवर गिरीष महाजन काहीच बोलत नाहीत, कारण त्यांना बोलायला जागा नाही. अशी सडेतोड प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कटप्पा कोण ? हे मी सांगण्यापेक्षा सगळ्या राज्याला माहित आहे. याथावकाश सगळ्याच गोष्टी पुढे येतील कारण काही प्रतिस्पर्ध्यांची गुरूकिल्ली व कुंडलीही नाथाभाऊंनी जपवून ठेवलेली आहे. असे सांगण्यासही आमदार मिटकरी विसरले नाहीत. याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, कार्यध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादी तालुध्यक्ष निळकंठ चौधरी, पं. स. सदस्य योगेश पाटील, माजी नगरसेवक राजेश वानखेडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, प्रणित महाजन, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1235145210205853/

Protected Content