गडचिरोलीत दोन नक्षलवादी ठार

 

 

गडचिरोली : वृत्तसंस्था । . एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांतर्गत  जंगल परिसरात चकमक झाली. पोलिसांनी  दोन नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.

 

२२ एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले होते. रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा गोळीबार केला होता. एक हँडग्रेनेडही फेकला होता. पोलीस दलाने परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबविली होती. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. पोलिसांनी त्यास प्रत्यत्तर देत गोळीबार केला असता चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस दलास यश आले.

 

२६ एप्रिलला नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली – तुमरगुडा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती.  पाण्याचे दोन टँकर, तीन ट्रॅक्टर व एक जोहान डिअर ट्रॅक्टरचा समावेश आहे.  घटनास्थळी बॅनर व पत्रके आढळून आली होती  ‘समाधान’ नावाने सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतिकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या ‘प्रहार दमन अभियानाच्या’ विरोधात एप्रिलमध्ये महिनाभर ‘प्रचार आणि जनआंदोलन उभे करा! असा उल्लेख होता. २६ एप्रिल रोजी या दमन मोहीमेच्या विरोधात भारत बंद करा असं आवाहन करण्यात आलं होतं.

Protected Content