रविंद्र पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगरातील रहिवाशी रविंद्र त्र्यंबक पाटील यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने सकाळी निधन झाले आहे. सायंकाळी ४ वाजता पिंप्राळा स्मशानभूमीत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

रविंद्र त्र्यंबक पाटील (वय- ६३) रा. प्लॉट नंबर १३, गट नंबर ९४/१, खोटे नगर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गेल्या महिन्याभरापासून ते शारिरीक व्यांधींनी ग्रस्त होते.  आज मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नात, नातू असा परिवार आहे. ते रंगकर्मी हर्षल पाटील यांचे वडील होते. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.  पिंप्राळा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

Protected Content