खोटं बोलणारे लोक राष्ट्रभक्त असून शकत नाहीत- राहूल गांधी

नवी दिल्ली । खोटं बोलणारे लोक राष्ट्रभक्त असून शकत नाही असे नमूद करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

भारत-चीन सीमावाद कायम असतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा याचं मुद्यावरून मोदी सरकार व भाजपावर निशाणा साधला आहे. जे लोकं खोटं बोलत आहेत, ते देशभक्त असूच शकत नाही, असं टीकास्त्र राहुल गांधी सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. यासोबत त्यांनी म्हटले आहे की, एक भारतीय म्हणून माझी पहिली प्राथमिक देश आणि देशातील जनता आहे. हे एकदम स्पष्ट आहे की, चीन आपल्या भूभागात घुसलेला आहे. ही गोष्ट मला अस्वस्थ करते. खरं सांगायचं तर माझं रक्त उसळतं. दुसरा देश माझ्या देशाच्या भूभागात येऊ कसा शकतो? आता एक राजकीय नेते म्हणून तुम्हाला वाटत की, मी गप्प रहावं आणि माझ्या लोकांशी खोटं बोलावं. जेव्हा की सत्य मला कळालं आहे. मी सॅटेलाईट फोटो बघितले आहेत. निवृत्त लष्करी अधिकार्‍यांशी बोललो आहे आणि तुम्हाला वाटत की मी खोटं बोलावं, असं राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हटलं आहे.
चीननं माझ्या देशात घुसखोरी केलेली नाही, असं मी खोटं बोलणार नाही. माझं पूर्ण करिअर बुडालं तरी चालेल, पण मी स्पष्ट करू इच्छितो की मी खोटं बोलणार नाही. मला वाटत चीननं घुसखोरी केली नाही, असं काही लोक खोटं बोलत आहेत. मला वाटत हेच लोक राष्ट्रवादी नाहीत. माझ्या मते जे लोक खोटं बोलत आहेत आणि सांगत आहेत की चीननं घुसखोरी केलेली नाही, ते लोकच देशभक्त नाहीत. मला याची राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, माझं राजकीय करिअर संपल, तरी काळजी नाही. पण, जिथपर्यंत भारतीय भूभागाचा प्रश्‍न आहे, मी केवळ सत्य बोलेल. असे नमूद करत राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Protected Content