खंडणीची मागणी करत महिलेच्या दोन्ही मुलांना मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील स्टेशन रोडजवळ हप्ता वसुली व खोट्या केसेस फसविण्याच्या कारणावरून एका महिलेच्या दोन मुलांना बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवार १४ मार्च रोजी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, बिकलीसबी शेख नासीर (वय-४४) रा. ख्वाजा नगर, काट्या फाईल, अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पती यांच्याकडून संशयित आरोपी राजकुमार महाराज जाधव, देवेंद्र जयपाल, नयन कुलदीप चव्हाण, हंसराज गुजर, आणि दिनेश फौजी सर्व रा. स्टेशन रोड, अमळनेर यांनी हप्ता वसुली करून खोट्या केसेस फसवणूक करण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात महिलेने अमळनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. दरम्यान, महिलेने न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घ्यावा, यासाठी ३ मे २०२२ रोजी पाचही जणांनी महिलेच्या घरी जावून तिला धमकी दिली. व तिच्या साहिल व जावेद शेख या लहान दोन मुलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जीवेठार मरण्याची धमकी दिली. व महिलेचा मुलगा साहिल याला डांबून ठेवले होते. महिलेची तक्रार पोलीसात न घेतल्यामुळे त्यांनी अमळनेर न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मारहाण करणाऱ्या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी करीत आहे.

Protected Content