कोरोना रोखण्यासाठी नवा कृती कार्यक्रम

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्रासह   देशातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं असून, या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवीन कृती कार्यक्रम केंद्राने हाती घेतला असून, राज्यांनाही सूचना दिल्या आहेत.

 

महाराष्ट्रासह काही राज्यात  दुसरी लाट आली आहे.  दुसऱ्या लाटेनं तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे आतापर्यंत उच्चांक मोडीत काढला आहे. इतरही ७ राज्यात कोरोनानं डोकं वर काढल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे.

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबद्दलची  माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. राज्य सरकारने त्या जिल्ह्यांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करावं. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जावं. त्याचबरोबर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांचा शोध घ्यावा, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

Protected Content