कृउबा समिती कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने ५ जून २०२० ला काढलेल्या बाजार समिती नियमनमुक्ती आदेशाविराेधात कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने येत्या २१ ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्राेत बंद हाेणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर समस्या निर्माण होणार असल्याने या संपाची घाेषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झालेल्या आहेत. शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेर देशात काेठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकताे. दरम्यान, या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना समितीच्या बाहेर झालेल्या शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मार्केट फी मिळणार नाही. बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल-मापाडी या सर्वांवर समितीचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी याेग्य भाव, पैसे मिळण्याची हमी मिळत असते.

शेतकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. बाजार समितीबाहेरचे व्यवहार शेतकऱ्यांसाठी तेवढे सुरक्षित राहणार नसल्याने बाजार समितींवरील नियमन मुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांसाठीदेखील याेग्य नसल्याचे बाजार समिती महासंघाचे म्हणणे आहे. राज्य बाजार समिती सहकारी संघ ही राज्यातील सर्व बाजार समित्यांची एकत्रित नोंदणीकृत संस्था आहे.

राज्यातील ३०७ पैकी ३०१ बाजार समित्या या संघाच्या सदस्या आहेत. सहकारी संघाने राज्यभरात या संपाची घाेषणा केलेली आहे. त्यामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील यार्डात येत्या २१ ऑगस्टला सकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत काेणतेही व्यवहार हाेणार नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी या दिवशी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन जळगाव बाजार समितीचे सभापती कैलास चाैधरी यांनी केले आहे.

Protected Content