किनगाव येथील शेतमजूराची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील ४० वर्षीय शेतमजूराने राहत्या घरात आज दुपारी साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनगाव खुर्द येथील साईबाबा मंदीर परिसरात राहणारे भगवान रघुनाथ पाटील (वय-४०)  हे पत्नी व मुलगा यांच्यासह राहतात. या तरूणाने आज सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी पत्नी व मुलगा शेतात कामाला गेले होते. त्यावेळी भगवान पाटील हे घरी एकटेच होते. दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या छताच्या पडतीला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजून आले नाही. यापुर्वी भागवत पाटील यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस पाटील दिलीप साळुंके यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी केले. पुढील तपास तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. मयत भगवान पाटील पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा असा परिवार आहे.

Protected Content