कानळदा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । गुरांना चारा घेण्यासाठी गेलेल्या तरूणाने शेतातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कानळदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अक्षय श्रीराम साळुंखे (१८) रा. कानळदा ता.जि.जळगाव आई-वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. दरम्यान, शुक्रवारी चोरा घेवून येतो असे सांगत घराबाहेर निघालेल्या अक्षयने शेतात गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यास जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़ नंतर तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती.

Protected Content