काँग्रेसने प्लॅन करुन शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं – चंद्रकांत पाटील यांचा आरोप

chandrakant patil

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसने प्लॅन करून शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेल्याचा आरोप माजी महसूलमंत्री आ. चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आज चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसने योग्य प्लॅन करुन शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्त्ववादी म्हणून मनसे आणि भाजपा येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असे त्यांनी सांगितलं. तर हिंदुत्त्व सोडलं नसेल तर शिवेसेनेने एनआरसीला समर्थन द्यावे अशी मागणी सुध्दा त्यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली होती ? अशी विचारणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर राज्य सरकारकडून योजना रद्द केल्या जात असल्याच्या निर्णयावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारने जुनं रद्द करण्यास काही हरकत नाही पण त्याला पर्याय दिला पाहिजे असं मत व्यक्त केले.

Protected Content