उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

साताराः वृत्तसंस्था । राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठी क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकार ११ ऑक्टोबरला परीक्षा घेणार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला घेतला नाही तर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना व मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससीची परिक्षा घेण्याची एवढी घाई का? असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

मराठा समाज जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. यांची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका,’ असा सूचक इशारा दिला आहे.

 

११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. मराठा आरक्षणाला कोर्टात स्थगिती दिल्यानंतर लगेच १५ हजार जागा भरण्याची सरकारला इतकी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळं मराठा समाजात चीड आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घेता येतील. विद्यार्थ्यांची परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वानांच संधी मिळेल अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळं कोणाचीही संधी हुकणार नाही हे नक्की. त्यामुळं शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित करावा

कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लास ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही , असेही त्यांचे म्हणणे आहे .

Protected Content