आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी- खा. उन्मेष पाटील

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हानी झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत केली.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे अनेक गावांतील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या गावांतील नुकसानग्रस्त पीकांचे पंतप्रधान पीक विमा योजनेतून भरपाईसाठी सरसकट पंचनामे करण्यात यावे यासाठी महसूल यंत्रणेला आदेश व्हावेत तसेच केंद्राकडूनही शेतकर्‍यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून नुकसानीची अधिकाधिक मदत मिळावी अशी आग्रही मागणी आज लोकसभेत खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील रब्बी पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, गहू, मका, बाजरी व भाजीपाला आदि पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे तब्बल २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. एकूण ३० हजार २६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतकरी बांधव उद्धवस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आपत्ती निवारण अंतर्गत अधिकाधिक मदत मिळावी अशी मागणी लोकसभेत खासदार उन्मेष पाटील यांनी मांडल्याने शेतकर्‍यांमध्ये मदत मिळण्याची आस लागली आहे.

Protected Content