आता ‘लक्ष्य’ मुंबई महापालिका ! : चंद्रकांत पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चार राज्यांमधील विजयाने भाजपच्या कामावर मतदारांचा विश्‍वास कायम असल्याचे स्पष्ट झाले असून आता आमचे ‘लक्ष्य’ मुंबई महापालिका असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आज केले आहे.

 

आज चार राज्यांमधील विजयाचे मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे. यात विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोवा निवडणुकीत पक्षाला यश मिळाल्याने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिसून येत आहे. फडणवीस यांचे पक्षाच्या कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आ. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आम्ही व्हिडीओजच्या माध्यमातून पुरावे देऊन सुध्दा सरकार कारवाई करत नसल्याने ते यात भागीदार असल्याचे सिध्द होत आहे. भाजपला देशभरातील जनतेचा मोठा पाठींबा असून याचीच प्रचिती चार राज्यांमध्ये आलेली आहे. आता आमचे ‘लक्ष्य’ मुंबई महापालिका असून यात आम्ही विजय मिळवणारच असा दावा त्यांनी याप्रसंगी केला.

Protected Content