आठनंतरची नववी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून नाराजी योग्य नाही

सांगलीः वृत्तसंस्था । ‘कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करु शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही,’ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी आज भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपतील अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे. खडसे भाजप सोडून जाणार नाहीत, असा विश्वास वेळोवेळी भाजपतून व्यक्त केला जात होता. प्रवीण दरेकर यांनीही ‘विचारधारा रुजवणाऱ्या नेत्यांनी पक्ष सोडणे योग्य नाही’, असं मत व्यक्त केलं आहे.

‘राजकारणात तुम्ही समाधानी नसला तर मरेपर्यंत तुमचं कोण समाधान करु शकत नाही. तुम्ही कायम नाराजचं राहता. कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करू शकत नाही. असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Protected Content