असुरक्षित वाटत असेल तर, फडणवीसांनी राज्य सोडून जाणे हाच एक उपाय : अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) केवळ खुर्ची गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणे हाच एक उपाय असू शकतो, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही, अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते.

 

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे. मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही, अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते. याच ट्विटला अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाच वर्षात फडणवीस सरकारने पोलिसांची स्तुती केली, सतत पोलिसांना शाबासकी दिली, पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. पण, केवळ खुर्ची गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणे हाच एक उपाय असू शकतो. अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखे काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत, अशी टीका अनिल परब यांनी अमृता फडणवीसांवर केली.

Protected Content