अर्णब गोस्वामीला  न्यायालयाचा दट्ट्या

रायगड : वृत्तसंस्था । निर्देशांचे पालन करा अन्यथा कारवाई करावीच लागेल असा दट्ट्या रायगड न्यालयाने दिल्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झालीय.

अलिबाग न्यायालयाने सुनावणी करताना अर्णबसह दोघांना १० मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत अलिबाग कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सक्त ताकिद दिलीय. त्यामुळे अर्नब गोस्वामींना स्वतः न्यायालयात हजर होण्याची नामुष्की येणार आहे

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत १० मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिलाय.

Protected Content