अरे व्वा… आज अवघे ३० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; पुन्हा सहा तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । आज अवघे ३० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात दिसून आले आहे. तर आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. ६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुके आज निरंक आहेत. तर उर्वरित जळगाव शहर- ८, भुसावळ-२, अमळनेर-२, चोपडा-३, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-२, रावेर-१, पारोळा-२, चाळीसगाव-८ असे एकुण ३० रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ५३ हजार ३५९ वर पोहचली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत १ हजार २६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ५१ हजार ४३० रूग्ण बरे होवून घरी सुखरूप परतले आहे. तर ६६० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ९६.३८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Protected Content