नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येत बांधण्यात येणार्या श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याची धमकी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने दिली आहे.
गजवा-ए-हिंद हा नियतकालिकाच्या ताज्या अंकातील एका लेखामध्ये अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरावर अल-कायदा ही संघटना हल्ला करून येथे पुन्हा बाबरी मशीद उभारणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. या लेखात अतिशय चिथावणीखोर भाषा वापरण्यात आलेली आहे.
या लेखात नमूद केले आहे की, भारतीय मुस्लीमांनी कुणाला घाबरू नये. धर्मनिरपेक्ष भारत हा नरक असून येथे मुसलमानांवर अन्याय होत आहे. २० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये नरसंहार झाला. तर आता बुलढोजर चालविण्यात येत आहे. आगामी काळात अयोध्येतील राम मंदिर पाडून तेथे बाबरी मशिद पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे.