अमृत महोत्सवनिमित्त धरणगावात तिरंगा रॅली जल्लोषात

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार रोजी सकाळी 9:00 वा. तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

रॅली मध्ये भारतावर प्रेम करणाऱ्या देशप्रेमी नागरीकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

भाजप कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, शिरीष बयास, अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली व वाजत गाजत मोटारसायकलीला तिरंगा झेंडा बांधून कार्यकर्ते संपूर्ण गावात फिरले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, ओबीसी आघाडी, शेतकरी आघाडी, व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content