…. अखेर संजय राठोड यांचा राजीनामा ?

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेने स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला आहे.

 

कालपासून संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शिवसेना नेत्यांचे मंथन सुरु होते . पक्षाची प्रतिमा डागाळायला नको म्हणून राजीनामा घेतला जावा असा मतप्रवाह प्रबळ झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची सूचना संजय राठोड यांना केल्याचे सांगण्यात आले

 

 

पूजा चव्हाण आत्महत्या घटनेत  आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप संजय राठोड यांनी काहीही   प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन, त्यांच्या राजीनाम्याची  व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 

संजय राठोड हे  नॉट रिचेबल आहेत. चार दिवसांपासून त्यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये उभी आहे. संजय राठोड यांचा कोणाशीच संपर्क नाही.  संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला शरण जाण्याची शक्यता आहेत. कारण पोहरादेवी हे बंजारा समाजाची  काशी समजली जाते. इथे येऊन संजय राठोड आपली भूमिका मांडण्याची चिन्हं आहेत. नुकतीच सेवालाल जयंती झाली. यावेळी बंजारा समाजाने संजय राठोड यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.

 

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.

 

पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज  यांचं निधन झालं होतं..

 

संजय राठोड यांच्या पाठिशी बंजार समाज उभा असल्याचं त्यांचे प्रतिनिधी सांगतात. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची  बैठक पार पडली. यावेळी विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

 

संजय राठोड यांचे नाव समोर करून, बंजारा समाजाची बदनामी होत आहे. यामुळं वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या महंतांनी बैठक घेऊन संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज उभा असल्याचं सांगितलं. समाजाची बदनामी थांबवावी असे आवाहन केले होते.आज त्या अनुषंगाने संजय राठोड यांच्या समर्थानात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथं बंजारा समाज समन्वय समितीच्या वतीने पोहरादेवी इथल्या सुनील महाराज आणि जितेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळा जवळून निषेध रॅली काढण्यात येणार आहे.

 

 

पूजाने  आत्महत्या केल्यानंतर गेल्या  संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्यावरील आरोपही खोडून काढले नाहीत. त्यामुळे राठोड यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे.राठोड गाडी सोडून अज्ञातवासात कुठे निघून गेले? असा सवाल केला जात आहे.

Protected Content