पाणी भरण्याच्या कारणावरून चौघांमध्ये झोंबाझोंबी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाणी भरण्याच्या कारणावरून हरीविठ्ठल येथे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील मश्जिदच्या पाठीमागील भागात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात चार जणांमध्ये झोंबाझोबी होवून चापटा बुक्क्यानी मारहाण केली आहे. रामानंदनगर पोलीसात परस्पर विरोधात तक्रार देण्यात आले आहे. यात उज्ज्वला अनिल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन तडवी आणि रशीदा तडवी दोन्ही रा. हरीविठ्ठल नगर यांच्या विरोधात तर सलमा हुसेन तडवी यांच्या फिर्यादीवरून उज्ज्वला सपकाळे आणि प्रियंका सपकाळे दोन्ही रा. हरीविठ्ठल नगर यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content