धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूण जागीच ठार

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रेल्वे दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत २५ वर्षीय तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दुपारच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांनी मयत तरुणाची ओळख पटवली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ऋषीकेश उर्फ बंटी आनंदा मिस्तरी (वय २५, रा. हरिविठ्ठल नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारा ऋषीकेश उर्फ बंटी मिस्तरी हा तरुण आई व भावासह वास्तव्यास असून तो मजूरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. रविवारी ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जळगाव ते शिरसोली दरम्यान, डाऊन रेल्वे लाईनवरील ४१६/ १४ दरम्यान, रेल्वेची धडक लागून ऋषीकेशचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना तेथून जात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस नाईक हेमंत कळसकर हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मयत तरुण हा हरिविठ्ठल नगरातील असल्याची ओळख नागरिकांनी पटवली. मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. सोमवारी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.

Protected Content