रिक्षा उलटल्याने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील श्री मनुदेवी मंदिरातून परत येत असतांना रिक्षा उलटून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचे उपचार घेत असतांना निधन झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळसह परिसरातील काही भाविक हे मनुदेवीचे दर्शन घेऊन ऍपे रिक्षाने परत येत असतांना मंदिर ते आडगावच्या दरम्यान एका वळणावर रिक्षा उलटून सहा महिलांसह एकूण आठ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती.

या अपघातात जखमी झालेल्या मालती रवींद्र वराळे (वय५४, रा. खडका, ता. भुसावळ) या महिलेवर उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. त्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी रवींद्र वराळे यांच्या पत्नी होत. यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिळ्के यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले . या संदर्भात यावल पोलीस स्टेशनमध्ये सुर्यकांत रविंद्र वराळे ( वय३० वर्ष) यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली असुन .घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहेत.

Protected Content