यंदा पांडुरंगाच्या उत्पन्नात दीडकोटीची विक्रमी वाढ

vithu mauli

पंढरपूर प्रतिनिधी । नुकताच, आषाढी वारीच्या काळात म्हणजेच ३ ते १७ जुलैदरम्यान लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. या आषाढीच्या १५ दिवसांच्या कालावधीत मंदिरे समितीला विविध माध्यमांतून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे़. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ५० लाख रुपयांची विक्रमी वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी यात्रा काळात भाविकांनी विठ्ठलचरणी ३९ लाख ६३ हजार ४२४ रुपयांचे दान तर रुक्मिणीमातेच्या चरणी ७ लाख ७२ हजार १८० रुपयांचे दान अर्पण केले आहे. देणगी स्वरुपातून १ कोटी ८४ लाख ५४ हजार ९१ रुपये, बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाच्या विक्रीतून ७२ लाख ४६ हजार २१० रुपये, नव्याने बांधलेल्या श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवासाच्या माध्यमातून १८ लाख ९१ हजार, वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास ३ लाख ५० हजार ४०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१८ मध्ये आषाढी वारीच्या काळात हे दान २ कोटी ९० लाख रुपये इतके होते. आषाढी वारीत भारत सेवाश्रम (कोलकात्ता), वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई), कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट (कराड), रेडक्रॉस सोसायटी, हरित वारी परिवार, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज यासह अन्य संस्थांनी वैद्यकीय सुविधा, पाणी वाटप, स्वच्छता, देणगी जमा करण्याकामी मदत आदी स्वयंसेवकांची सेवा बजावल्या होत्या.

Protected Content