चितोडा येथे हिवाळी श्रम संस्कार शिबीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दत्तक गाव चितोडा येथे माजी सैनिक प्रभाकर झोपे यांच्या हस्ते झाले.
सकाळच्या सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन झाले. यावेळी माजी सैनिक प्रभाकर झोपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाज‌सेवा केली पाहिजे.
व्यावहारिक जीवनात कौशल्य युक्त शिक्षण अंगिकारणे महत्त्वाचे आहे, त्यातून समाजाची, गावाची, देशाची प्रगती होत जाते असे सांगितले. पी. व्ही. तळेले (ग्रामसेवक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.कडू पाटील (माजी सरपंच), साहिल तडवी (यावल तालुका अध्यक्ष) यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतःला सिध्द करण्यासाठी झोकून दिले पाहिजे.
त्यासाठी शिस्त, शांतता, नम्रता हे गुण अंगिकारणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
सकाळच्या सत्रात श्रमदान करताना कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मतदार दिनानिमित्त शपथ घेतली व ई. व्ही. एम.मतदान मशीन बाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. निलेश पाचलोखे, हेमा सांगोळे यांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या बौद्धिक क्षेत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी.खैरनार यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन देताना विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकास करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अंतर्मन बाह्यमन आवडी निवडीच्या गोष्टी, हौशी मौजेच्या वस्तू, मोबाईल टी .व्ही. ह्यात वेळ जास्त घालू नये. मनावर ताबा ठेवावा चिंतन, मनन, योगा, तसेच स्थिर मन असणे आवश्यक आहे. हे सांगताना त्यांनी व्यक्तिमत्व विकासाच्या बारा पैलुंचे महत्त्व उघडून दाखवले. चांगले श्रोते, विनोदी बुद्धी, ज्येष्ठ व्यक्ती विषयी आदर, स्वतःच्या शारीरिक रचनेत बदल, आत्मपरीक्षण चांगले निर्णय, कलागुणांचे प्रदर्शन, सकारात्मक ऊर्जा, उच्च विचार सरणी, ऐतिहासिक गोष्टींचा छंद, नेटकेपणा, समाज सुचकता, व्यवहारिक ज्ञान, अंगी जोपासणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाला पंकज वारके, मुख्याध्यापिका कुंदा गाजरे, प्राथमिक शिक्षिका अर्चना कोल्हे गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर. डी.पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा. सुभाष कामडी यांनी मानले.

Protected Content