योग्य साधनांची निवड केली की ध्येय प्राप्ती होतेच – डॉ.अविनाश सावजी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, भुसावळ यांच्यातर्फे आयोजित ‘यशस्वी होण्याचा मूलमंत्र’ या विषयावर प्रयास सेवांकुर संस्था अमरावतीचे सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ.अविनाश सावजी याचं व्याख्यान संपन्न झालं.

यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “मुलांनी योग्य साधनांची निवड केली की ध्येयप्राप्ती ही होतेच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून त्याची तंतोतंत अंमलबजावणी आपल्या आयुष्यामध्ये करणे, पेपर सोडवण्याचे वेगवेगळे टप्पे निश्चित करून पेपर सोडवावे, मन एकाग्रता तंत्राचा व शरीर शिथिलीकरण तंत्राचा उपयोग करून स्वतःच्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात” असे डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले.

श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री सोनू मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या जीवनातील यशस्विता या विषयावर समुपदेशन व्याख्यान ठेवण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चौधरी यांनी तर पाहुण्यांचा परिचय आशिष सैतवाल यांनी करून दिला. आभार महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी मानले.

Protected Content