महाविकासआघाडीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका ; उद्धव ठाकरेंचा शपथविधी रोखण्याची मागणी

 

thorat 01

 

मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूकपूर्व युती तोडून नव्या आघाडीचं सरकार बनवणं ही मतदारांची फसवणूक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावे, अशी याचिका हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने मात्र याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. दरम्यान हा शपथविधी रोखण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

Protected Content