महाराष्ट्राने देशाला नवा मार्ग दाखवला, आता दिल्लीतही एकत्र जाऊ : संजय राऊत

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. भाजपाला राज्यात अघोरी प्रयत्न करूनही आपला निर्णय लादता आला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या हिताचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता दिल्लीतही एकत्र जाऊ असे सांगितले आहे, असे सूचक विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत मोथे वक्तव्य केले आहे.

 

उद्यापासून राज्याचे मुख्यमंत्री असतील. ते आणि त्यांचे सहकारी राज्याचे निर्णय घेतील. माझी जबाबदारी पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कोणापुढेही झुकणार नाही. महाराष्ट्राने देशाला नवा मार्ग दाखवला आहे. माझी जबाबदारी आता कमी झाली आहे. आता मी उद्यापासून बोलणार नाही मला जे मिशन दिले होते ते पूर्ण झाले,असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. तसेच राऊत यांनी देशातील परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे,असे सूचक वक्तव्यही केले आहे.

Protected Content