केळी घेण्याच्या कारणावरून दोन जणांवर चाकूहल्ला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी घेण्याच्या कारणावरून दोन जणांवर चाकून वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अजहर खान इकबाल खान (वय-२८) रा. अक्सानगर, मेहरूण, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार १ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता अजहर खान हा मित्र अशरफ खान याच्यासोबत मास्टर कॉलनीतील चटोरी गल्लीत केळी घेण्यासाठी गेले. केळी विक्रेत्याकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ते अजहर खान याने खरेदी केली. त्याठिकाणी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे यांनी केळी आम्ही घेतल्याचे सांगून शिवगीळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दानिश पिरजादे यांने खिश्यातून चाकू काढून अशरफ खान आणि अजहर खान यांच्यावर वार करून जखमी केले. जखमी झालेल्या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अजहर खान यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे सर्व रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

 

Protected Content