श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमध्ये आज (दि.21) पाकिस्तानच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पल्लनवाला आणि अखनूर येथील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला केला असून या प्रत्युत्तरदाखल भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अखनूर आणि पल्लनवाला नियंत्रण रेषेवर अद्यापही गोळीबार सुरू असल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेवरील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सैनिकांनी सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शुक्रवारी पुंछ जिल्ह्यातही नियंत्रण रेषेवरील भारतीय जवानांच्या चौक्या आणि गावांच्या दिशेने पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर मोर्टारचा माराही केला.