मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसा येथील एका शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्यात दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. 

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळसा तालुका यावल येथील राहणारे शेतकरी भागवत भास्कर काठोके हे अल्पभूधारक शेतकरी होते त्यांनी जोडधंदा म्हणून ते गाईचा व्यवसाय करायचे नेहमी प्रमाणे दि.११ डिसेंबर रोजी ते सकाळी पाडळसा शिवारातील शेतात गाई चारायला गेले असता दुपारी ३ वाजेच्या सुमारास झाडावरुन अचानक त्यांच्यावर मद्यमाश्यांनी हल्ला चढवला (आगे मोहोळ)या हल्या मध्ये ते गंभीर जखमी झाले असता त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे  दि.१३ रोजी दुःखद निधन झाले.

भागवत काठोके हे जन्मापासून मूके होते. त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. भागवत काठोके त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली एक विवाहित मुलगा व पत्नी असा परिवार आहे. 

 

Protected Content