कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल !; नातेवाईकांच आक्रोश

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील रूंधाटी गावातील शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास आत्माराम पाटील वय ५६ रा. रूंधाटी ता. अमळनेर असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील रूंधाटी येथे विलास पाटील हे प्रौढ व्यक्ती आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. दरम्यान, त्यांनी कर्जाबाजारीला कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवार १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्‍या सुमारास उघडकीला आले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.

Protected Content