बाभुळगाव येथे विजेच्या धक्क्याने तीन गुरे जागीच ठार

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बाभुळगाव येथे सकाळी झालेल्या पावसामुळे विजेचे तार तुटून पडल्याने शेतकऱ्याचे तीन गुरे विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील बाभुळगाव येथे आज सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे येथील शेतकरी लक्ष्मण तुकाराम कोळी यांच्या मालकीचे तीन गुरांवर विजेचे तार तुटून पडल्याने विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली.  सर्व गुरे घेऊन चरण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यात शेतकऱ्याचे जवळ पास २ लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी आरिफ शेख पचनामा करत व सरपंच देखील उपस्थित आहेत आहे. व त्यांनी याबाबत पोलीस स्टेशन, महावितरण यांना देखील या घटनेची माहिती दिल्याचे सगण्यात येत आहे

Protected Content