अपंग प्रमाणपत्र प्रकरणात चुकीला माफी नाही – डॉ. पंकज आशिया

रावेर प्रतिनिधी । रावेर ग्रामसेवकांचे खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणावर माझ लक्ष आहे. या प्रकरणाची मी स्वता: लक्ष घालून चौकशी करणार आहे. चुकी केली असेल तर माफी कोणालाच मिळाणार नसल्याचे जळगाव जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले आहे. 

रावेर तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी सोईच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणुन खोटे अपंग प्रमाणपत्र काढल्याचे माहिती अधिकारातुन उघड झाले. परंतु या प्रकरणाला खरी दिशा तेव्हा मिळाली जेव्हा यातील काही ग्राम सेवकांनी खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणात सेटलमेंट करून दडपण्यासाठी प्रर्यत्न सुरु केला. परंतु या प्रकरणात आता जळगाव जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी IAS डॉ. पंकज आशिया यांनी लक्ष घातले आहे.

Protected Content