वाळू घाटांची निविदा मुदत शुक्रवारी संपणार – लगेचच ई-ऑक्शनद्वारे वाळू घाटांसाठी लागेल बोली

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील वाळू घाटांच्या ई-ऑक्शनद्वारा लिलाव प्रक्रियेसाठी ऑनलाईन निविदा स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी दुपारी संपणार असून मुदतीनंतर लगेचच ई-ऑक्शनद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील वाळू घाटांची ई-ऑक्शनद्वारा लिलाव प्रक्रियेसाठी गेल्या फेबुवारीच्या शेवटच्या सप्ताहात निविदासुचनेस जाहीर प्रसिद्धी देण्यात आली होती. या ऑनलाईन निविदा स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी दुपारी संपणार असून मुदतीनंतर लगेचच ई-ऑक्शनद्वारे लागणार निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात गिरणा, तापी, वाघूरसह अन्य नदी नाले ओढे आदी ठिकाणच्या सुमारे १४५ च्या वर वाळू घाट आहेत. यापैकी ३४ ठिकाणच्या वाळू घाटांच्या लिलावास मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात ३४ वाळू घाटांसाठी ई-ऑक्शनद्वारा लिलाव प्रक्रियेसाठी निविदा प्रसिद्धी देण्यात आली होती.

जिल्ह्यात नदी नाले, ओढ्यातील वाळू साठा उचलण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या वर्षी २१ वाळूघाटांचे लिलाव झाले होते. त्यापैकी ८ घाटांसाठीच निविदाकारांनी अनामत रकमेचा भरणा केला. त्यामानाने अनेक वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उचल झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासह वाळू घाटांच्या लिलावातून शासनाला महसूल मिळावा यासाठी जिल्ह्यात ३४ वाळूघाटांचे लिलाव प्रस्तावित करण्यात आले आहेत. या वाळू घाटांची प्रशासकीय धोरणानुसार ६ कोटी ३८ लाख ५१ हजार ३७३ निश्चित करण्यात आली आहे. तर १ लक्ष ९ हजार ८२ ब्रास वाळू उत्खननासाठी प्रस्तावित आहे.

असे आहेत वाळू घाट

जोगलखेडे, बेल्व्हाय १,२, ता. भुसावळ, पिंप्री, सुटकार ता.चोपडा, थोरगव्हाण, पिंप्री, शिरागड, पथराळे ता. यावल, भोकरी, पातोंडी, पिंप्रीनांदू ता.मुक्ताईनगर, रुंधाटी२, हिंगोणे सिम, धावडे, तांदळी, जळोद, ता.अमळनेर, वडगाव, आंदळवाडी, केऱ्हाळे खु, धुरखेडा, पातोंडी,दोधे ता.रावेर, बाभुळगाव १, २ ता.धरणगाव, भोकर, पळसोद ता.जळगाव, उत्राण प्र.ह, १,२ हनुमंतखेडा सिम १,२ ता. एरंडोल असे ३४ वाळू घाट प्रस्तावित असून यांची लिलाव प्रक्रिया अंमलबजावणी शुक्रवारी निविदा मुदत संपल्यानंतर लगेचच केली जाणार असल्याचे जिल्हा गौण खनीकर्म अधिकारी दिपक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Protected Content