राज्यात लवकरच होणार पोलीस भरती प्रक्रिया

मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत घेणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. लवकरच त्यांची प्रतिक्षा समाप्त होत राज्यात आता लवकरच सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. मात्र लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यांत सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असून दहा हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी गृहखातं हि भरती प्रक्रिया राबवणार आहे. राज्यात  मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज असल्याने राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्षातून एकदा पोलीस भरती ही होत असते. पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून वर्षभर ही लोकं तयारीला लागतात. अशा तरूणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

Protected Content