मुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळे राज्यपाल भडकले !

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातील भाषेवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संतापले असून त्यांनी याला अतिशय खरमरीत भाषेत उत्तर दिले आहे.

या संदर्भात माहिती अशी की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेणारं पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तिखट भाषेत उत्तर देणारं पत्रं पाठवलं होतं. त्यावर राज्यपालांनी आपलं उत्तर मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवरच नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्रात राज्यपालांनी म्हटले आहे की, आपले पत्र वाचून मी व्यथित झालोय, निराश झालोय. माझ्यावर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव आणणं योग्य नाही. तुमच्याकडे असे अधिकार नाहीत. मी घटनेच्या चौकटीत राहून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करुन मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही., असंही राज्यपाल म्हणाले आहेत.

यात पुढे म्हटले आहे की, तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद २०८ नुसार नियम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्याच अनुच्छेदात म्हटलं आहे की, जो काही विधीमंडळाचा निर्णय घेतला जाईल. तो संविधानिक असला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया पार पाडूनच त्याची कार्यपद्धती असली पाहिजे. संविधानाच्या कलम १५९ नुसार राज्य घटनेचं संरक्षण, संवर्धन आणि बचाव करण्याची मी शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भातील नियमात करण्यात आलेले बदल हे प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्यानं त्याला सद्यस्थितीत मंजुरी देता येणार नाही. तुमच्या पत्राचा असंयमी टोन आणि धमकावणारा सूर पाहुण मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र संविधानचं सर्वोच्च ऑफिस असलेल्या राज्यपालाचा अपमान आणि बदनामी करणारं आहे असे राज्यपालांनी यात म्हटले आहे.

Protected Content