सरकारने जनतेला शब्दांमध्येच गुंडाळले – अभिषेक पाटील

abhishek patil app

जळगाव, प्रतिनिधी | विद्यमान सरकारकडून जनतेला आधीपासूनच शब्दांमध्ये गुंडाळण्यात आले आहे, असा आरोप जळगाव शहर मतदार संघातील महा आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज (दि.१७) शहरातील नागरिकांशी बोलताना केला आहे.

 

सत्ताधाऱ्यांनी कधीच जनतेला हव्या असलेल्या सुविधांना पूर्णत्वास जाऊ दिले नाही. आपल्या राज्यात आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोठी फरफट झाली आहे. कधी सरकार म्हणते मालाला भाव नाही तर कधी म्हणते हवामानाला ताल नाही. या सरकारला खरं म्हणजे शेतकऱ्यांची काळजीच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Protected Content