‘त्या’ इमारती खाली दबलेल्या वृध्द महिलेचा मृत्यू; तब्बल पाच तासानंतर काढले बाहेर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगावातील छत्रपती शिवाजी नगरातील तीन मधली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली होती.  या घटनेत एक महिला इमारतीखाली दाबली गेली होती. तब्बल पाच तासांच्या बचाव कार्य तसेच शोध मोहिमेनंतर महिला सापडली आहे. इमारती खाली दबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  राजश्री सुरेश पाठक वय ७५ असे या मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

जळगाव शहरातील शिवाजी नगरात ७४ वर्ष जुनी इमारत आहे. पाठक यांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ते राहत नव्हते. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार आज मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाक बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं. तर एक जयश्री पाठक या वृध्द महिला इमारतीच्या ठिगाऱ्याखाली अडकल्या. त्यांना वाचवण्यासाठी ही प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले.  दरम्यान तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जयश्री  पाठक यांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

इमारत खाली करण्याबाबत महापालिकेकडून देण्यात आली होती नोटीस…

अनेक वर्षांपासून वर्षापासूनची ही जीर्ण इमारत होती ती रिकामी करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती.. मात्र त्यानंतरही ती इमारत रिकामी करण्यात नाल्याने आज ही दुर्घटना घडली आहे.  या इमारतीमध्ये एकूण चार जण होते त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आल आहे तर एक महिला या ठिकाणी अडकलेली असून तिलाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Protected Content