बालाकोटमधील दहशतवादी ठिकाणे पुन्हा सक्रिय : रावत

bipin rawat

चेन्नई, वृत्तसंस्था | भारताने उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांची ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केली आहेत. बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जावू शकतात. कमीत कमी ५०० दहशतवादी पीओकेमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज (दि.२३) येथे दिली. इस्लामचा गैरवापर केला जात असून धर्मगुरुंनी इस्लामचा खरा अर्थ लोकांना समजावून सांगायला हवा, असेही रावत म्हणाले.

 

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने उघडपणे म्हटलेय की, आम्ही दहशतवादी पाठवू, म्हणून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. आम्ही बालाकोटपेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो, असा थेट इशारा लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे. बालाकोटमधील दहशतवादी शिबिरे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहेत. ही शिबिरे नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. तसेच पीओकेमधून ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे, असेही रावत म्हणाले. घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. घुसखोरीचे अनेक प्रयत्न यापूर्वी भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत, असेही लष्करप्रमुख म्हणाले.

Protected Content