पहलगाममध्ये भयंकर दहशतवादी हल्ला !

पहलगाम-वृत्तसेवा | पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली असून यात 25 पेक्षा जास्त स्त्री-पुरूषांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडलेली नसल्याने पर्यटक मोठ्या संख्येने यंदा मोठ्या प्रमाणात येथे दाखल झाले आहेत. याच पर्यटकांवर आज दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात नेमका किती जणांचा मृत्यू झाला ? याची माहिती अद्याप समोर आली नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा या 25 पेक्षा जास्त असण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर असून त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तर गृहमंत्री अमित शाहा हे तात्काळ श्रीनगर येथे रवाना झाले आहेत. या परिसरात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. अमरनाथ यात्रेच्या आधी हा भीषण हल्ला झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content