भाजप सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविले-प्रियंका
नवी दिल्ली । राहूल गांधी यांनी दिलेल्या इशार्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून भाजप सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविल्याचा आरोप प्रियंका गांधी-वधेरा यांनी केला आहे.
नवी दिल्ली । राहूल गांधी यांनी दिलेल्या इशार्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून भाजप सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविल्याचा आरोप प्रियंका गांधी-वधेरा यांनी केला आहे.
नवी दिल्ली । दिल्लीतील हिंसाचाराबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढणार्या न्यायाधिशांची तडकाफडकी केलेली बदली ही खेदजनक आणि लाजीरवाणी बाब असल्याचे नमूद करत काँग्रेसच्या महासरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची काल मध्यरात्री बदली करण्यात आली. यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त … Read more
नवी दिल्ली । काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा केली आहे. जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अद्यापही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यावरुन प्रियंका गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून … Read more
नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली असल्याने मोदी सरकार रोजगाराबाबत बोलण्यास तयार नसल्याचा टोला मारत प्रियंका गांधी यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशातील वाढती बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रियंका यांनी ट्वीट करत भाजपला लक्ष् केले आहे. देशातील सात प्रमुख क्षेत्रांमध्ये सुमारे साडेसात … Read more
नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील मंदिबाबत अचाट कारणे देणार्या मोदी सरकारची आज काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी क्रिकेटमधील एका अफलातून कॅचच्या व्हिडीओच्या माध्यमातून जोरदार खिल्ल उडविली आहे. देशात मंदिचे वातावरण असतांना मोदी सरकारचे मंत्री यासाठी वेगवेगळी कारणे देत आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी वाहन क्षेत्रातील मंदीसाठी ओला व उबरसारख्या सेवांना कारणीभूत ठरविल्याने सोशल मीडियात त्यांची टर उडविण्यात … Read more
लखनऊ वृत्तसंस्था । काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल रात्रभर आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत पहाटे पाच वाजेपर्यंत मंथन केले. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशाची धुरा सोपविण्यात आली आहे. गत दोन दिवसांपासून त्या लखनऊ येथे आहेत. आधी त्यांनी शहरात रोड शो केला. तर काल रात्रभर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. … Read more
मुंबई प्रतिनिधी । नुकत्याच राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियंका गांधी या नंदुरबारातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. २३ जानेवारी रोजी प्रियंका गांधी या अधिकृतपणे काँग्रेस पक्षात सक्रीय होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा त्या विदेशात होत्या. रात्री उशीरा त्या दिल्ली येथे परतल्या असून येत्या काही दिवसांमध्ये त्या प्रत्यक्ष राजकारणात … Read more
नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रियंका गांधी यांना मानसिक विकार असून त्या लोकांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. यात या पक्षाचे बोलभांड नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीकास्त्र सोडले आहे. आज ते म्हणाले की, … Read more
मुंबई प्रतिनिधी । प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाचे उध्दव ठाकरे यांनी दिलखुलासपणे स्वागत करून त्या हुकुमाची राणी सिध्दी होऊ शकतात असे भाकीत केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनात आज हुकुमाची राणी या शीर्षकाखालील अग्रलेखात उध्दव ठाकरे यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे. यात म्हटले आहे की, प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब … Read more
मुंबई प्रतिनिधी । प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावरून भाजप नेत्यांनी टिकेचा सुर लावला असतांना मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी मात्र त्यांना शुभेच्छा देऊन उमदेपणा दाखवून दिला आहे. कालच प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाचा श्रीगणेशा झाला. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे काँग्रेसी उत्साही झाले असून भाजपने मात्र त्यांच्यावर जोरदार … Read more
Protected Content