भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता ; सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

1567700531

 

इंदापूर (वृत्तसंस्था) कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता? असा टोला लगावला आहे. दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपात अधिकृत प्रवेश केला आहे.

 

इंदापूरच्या जागेचा विषय जागा वाटपाच्या चर्चेला येण्यापुर्वीच हर्षवर्धन पाटील यानी हे पाऊल उचलण अत्यंत दुखद असल्याचे मत सुळे यानी व्यक्त केले. ‘त्यांच्या उमेदवारीला कुणीच नाही म्हणाले नव्हते, तरी त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला. आज हे काहीही आरोप करीत आहेत. त्याचे वाईट वाटते,’ असे त्या म्हणाल्या. त्यांची बाजू खरी होती मग ते 48 तास नॉट रिचेबल का होते, मोबाइल बंद ठेवण्या सारखं काय झाले होते?, असा प्रश्न त्यानी पाटील यांच्या पक्षांतराच्या निमीत्ताने उपस्थित केला आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी, “हर्षवर्धन पाटील यांचे भाषण ऐकून आपण अनेक वेळा त्यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही,” अशी माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी आपली राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची कधीच भेट झाली नसल्याचे सांगितले. भाजपा पक्षप्रवेशावर बोलताना भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता असा टोलाही त्यांनीही लगावला.

Protected Content