अमळनेर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांची दहशत पसरल्याने रात्रीच्या वेळी एकट्या व्यक्तीने बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. आज ता.19 रोजी दुपारी शहरातील कसाली मोहल्ला येथील तीन मुलांना कुत्र्यांनी जबर चावा घेतल्याने त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पंधरा दिवसात ही अमळनेर शहरातील दुसरी घटना असून अजूनही नगरपालिका प्रशासन याबाबत बघ्याची भूमिका घेतली आहे. मागील आठवड्यात गुरुकृपा कॉलनीतील लहान मुलीला चार ते पाच कुत्र्यांनी घेरून चावा घेतल्याने तीला पन्नास टाके पडले होते.

आज ही अली खान (वय -9), शाहनवाज शाह (वय -9), परवेज शाह (वय -8) या तीनही मुलांना भर दुपारी कुत्र्यांनी चावा घेतल्याने शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलांना एकटे शाळेत, शिकवणीला कसे जाऊ द्यायचे हा प्रश्न पालकांना पडला आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन याचा बंदोबस्त करावा असे सांगितले जात आहेत.

Protected Content