धनगर समाजाचे रक्ताने लिहिलेले निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाला एस.टी.प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करावी, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषीत केलेल्या एक हजार कोटी रूपयाची तरतूद करावी, मेंढपाळांना संरक्षण देवून त्यांच्यावरील हल्ले त्वरीत थांबवावे यासह आदी मागण्यांचे निवेदन यावेळी दिली. धनगर समाजाच्या मागण्यांच्या मान्य न झाल्यास धनगर समाज राज्यात तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी भरत येवस्कर, नाना धनगर, बाळा कंखरे, अंकुश सोनवणे, धनराज धनगर, चंद्रकांत श्रावणे, बंटी परदेशी, साईनाथ येवस्कर, सचिन बोरसे आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/watch/?v=1185139188518941

Protected Content