भरधाव कारने पायी चालणार्‍या यात्रेकरूंना चिरडले : सहा भाविक ठार

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पायी चालणार्‍या यात्रेकरूंना भरधाव कारने चिरडल्याने सहा भाविक ठार झाल्याची दुर्घटना आज गुजरातमध्ये घडली आहे

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने काही भाविकांना जोरदार धडक दिली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अरवल्तील कृष्णापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

भाविकांना उडविणारी कार ही महाराष्ट्र पासिंगची असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या अपघातातील मृतांची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे सर्व जण पायी अंबाजीच्या दर्शनासाठी चालत निघाले होते. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा अपघात नेमकं कसा झाला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत

Protected Content