प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी गावपातळीवर विशेष मोहिम !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बैंक खाती आधार संलग्न व योजनेचे e-KYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९०.२० लाख लाभाध्यांनी केलेली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ०५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थीनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, या मोहिमेमध्ये लाभार्थीची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बैंक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बैंक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बैंक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थीनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding No) लाभार्थीनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बैंक (IPPB) च्या मार्फत कार्यपूर्तता करावी.

पी.एम. किसान योजनेचा १७ वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बैंक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वतः करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

Protected Content