… तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल ! – आ. एकनाथराव खडसे

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंत्री पद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसून आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भडगाव-पाचोर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चांगलीच शिंदे गटावर चांगलीच फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री आमदार खडसे म्हणाले की, येणाऱ्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आतापासून तयारीला लागले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघात माजी आमदार दिलीप वाघ हे विधानसभेचे पहिले दावेदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागलो असून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद साधला जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

शिंदे सरकारवर खडसेंची टिका
जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांमध्येच मंत्रीपदासाठी रस्सीखेच असल्याची टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली असून मंत्री पदासाठी सुरुवातीला अनेक गाड्या भरून मुंबईकडे गेल्या मात्र आता पन्नास खोके घेतले आहे मग कशाला पाहिजे मंत्री पद असे एकनाथ शिंदे त्याचा कानात संगात आहेत. त्यामुळे आता सर्व गुपचूप बसले असल्याची खोचक टीकाही एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Protected Content