तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल : नवाब मलिक

4Nawab Malik 14

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे महाविकासआघाडीच्या शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसे असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

 

ठाकरे सरकारच्या शपथविधीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. महापुरुषांबद्दल आम्हालाही आदर आहे, मात्र शपथविधी हा शपथविधी असतो, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसे झाले तर संसद रिकामी करावी लागेल, असे नवाब मलिक म्हणाले.

Protected Content