घर खाली करण्याच्या कारणावरून भावंडाना बेदम मारहाण

शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगर भागात घर खाली करण्याच्या कारणावरून अंडा पाव विक्रीची गाडी असलेल्या तरुणासह त्याच्या भावाला तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार ४ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता शनिपेठ पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , जळगाव शहरातील तानाजी मालुसरे नगरात मनोज सुभाष तायडे हा तरुण वास्तव्यास आहे. मनोज व पारस धर्मेंद्र सोनवणे यांच्यात घर खाली करण्यावरून वाद आहे. मंगळवारी मनोज हा त्याचा भाऊ नितेश याच्या सोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना वाल्मीक नगरात मंदिराजवळ पारस सोनवणे याच्यासह चार जणांनी मनोज यास थांबवले. तसेच तू आम्हाला घर का खाली करायला लावत आहे, असे विचारून पारस सोनवणे यांच्यासोबत असलेल्या भैया गजानन सोनवणे यांनी मनोज याच्या डोक्यात काठीने मारहाण केली तर इतर अजय गजानन सोनवणे व विशाल गजानन सोनवणे यांनी मनोज याचा भाऊ नितेश यालाही मारहाण करून दुखापत केली. मारहाणीनंतर चारही जणांनी शिवीगाळ करत तुम्ही जर आमचे नादी लागले तर तुमच्या हात पाय तोडून मर्डर करून टाकू अशी धमकी सुद्धा दिली. मारहाणीत मनोज तायडे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनोज तायडे यांच्या तक्रारीवरून पारस धर्मेंद्र सोनवणे , भैया गजानन सोनवणे अजय गजानन सोनवणे , विशाल गजानन सोनवणे, सर्व रां. वाल्मिक नगर या चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहेत.

Protected Content